शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!
शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा… महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…