मनरेगातून जलसंधारणाची नवी दिशा “जलतारा”…
“जलतारा : शेतीसाठी पाण्याचा शाश्वत आधार” पावसावर अवलंबून असलेली महाराष्ट्रातील शेती अनेकदा पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत येते. काही वेळा पाऊस भरपूर पडतो, परंतु पावसाचे सर्व पाणी वाहून जाते आणि जमिनीला किंवा भूगर्भातील जलसाठ्याला त्याचा फारसा उपयोग होत नाही. परिणामी, थोड्याच काळात पाण्याची टंचाई भासू लागते. यावर उपाय म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)…