बनावट खत-विषारी औषधांवर कठोर कारवाईसाठी नवा कायदा तयार करणार – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे नारायणगाव येथे आश्वासन
नारायणगाव (जि. पुणे),दि.३: “शेतकऱ्यांच्या समृद्धीशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या सहाव्या दिवशी नारायणगाव (पुणे) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बनावट खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट…